शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना: अंतर्गत शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सदर योजनेसाठी शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव, अमरावती, औरंगाबाद, व धुळे यांचेकरिता प्रत्येकी 20 प्रमाणे एकुण 80 संच मंजुर आहे.
विभाग
उच्च शिक्षण संचालनालय
शिष्यवृत्ती
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना
लाभ
विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना उद्देश
विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजनेचे वैशिष्ट्य
राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी
गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजनेचा फायदा
या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
राज्यात कोणताही विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
इयत्ता
दर महिन्याला
वर्षाला
10वी
100/- रुपये
1,000/- रुपये
12वी
100/- रुपये
1,000/- रुपये
पदव्युत्तर
150/- रुपये
1,500/- रुपये
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजनाअंतर्गत आवश्यक पात्रता
अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजनेच्या अटी
अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जदार विद्यार्थी कुठेही पुर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव, अमरावती, औरंगाबाद, व धुळे मधून इयत्ता 10वी च्या वर्गात 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.
सदर शिष्यवृत्ती मंजुर झाल्यास इतर केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महाराष्ट्र बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत
अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर शिष्यवृत्ती चा लाभ घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जदार विद्यार्थी पात्रता धारण करत नसल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
नूतनीकरण धोरण
या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मागील वर्षाची गुणपत्रिका
बोनाफाईड सर्टिफिकेट
नवीन मंजुरी साठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेबाबतचे बोनाफाईड प्रमापत्र.
नवीन मंजुरी साठी शासकीय निद्यानिकेतनाद्वारे प्राप्त इन्टायटलमेंट कार्ड.
आम्ही शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.