कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्तीचा उद्देश त्या विद्यार्थ्यांना अधिक उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा असून ही योजना इयत्ता 11 वी आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देते. दहावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांकडून शालेय शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र शासनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात ओपन मेरिट शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले जातात.
या योजनेअंतर्गत इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 50 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
विभाग
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शिष्यवृत्ती
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती
लाभ
इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 50/- रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजना उद्देश
विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेचे वैशिष्ट्य
राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेचा फायदा
या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतील.
राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
राज्यात कोणताही विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
इयत्ता
दरमहा
वार्षिक
11वी
50/- रुपये
500/- रुपये
12वी
50/- रुपये
50/- रुपये
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता
अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेच्या अटी
अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
अर्जदार विद्यार्थी कुठेही पुर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदार विद्यार्थी हा इयत्ता 11वी किंवा इयत्ता 12वी चा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
अर्जदार हा इयत्ता ११वी किंवा १२वी चा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्षात समाधानकारक प्रगती आणि ज्युनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी 50% गुण मिळवणे शिष्यवृत्ती चालू ठेवण्यासाठी अवलंबून आहे.
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
आम्ही कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.